आवळा देऊन कोहळा काढण्याचे प्रकार तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल . किंवा लबाड लांडगा ढोंग करतेय ,लगीन करायचं सोंग करतेय , असले वाक्यप्रकार अनेकवेळा ऐकले असेल . या वाक्य प्रकारातून काय अर्थबोध होतो तर जस भासविल जात तसं ते वास्तवत बिलकुल नसत . किंबहुना गैर अर्थाने आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी अशी मंडळी कमालीची नाटकं करतात . मग प्रसंगाची मागणी नसतांना त्यात अगौची फोडणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करतात . हे सर्व यासाठी सांगतोय की गेल्या काही आठवड्यात आपल्या देशात काही अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत . देशात आणि जगतच कोरोंना महामारीचा प्रकोप चालू असतांना ज्यापद्धतीने शेतकर्यांच्या भलाईसाठी म्हणून जे तीन कृषि कायदे केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सम्मत करवून घेतले ,त्या पद्धतीवर देशाचा अन्नदाता म्हणवल्या जाणारा शेतकरीच नव्हे तर सर्व सामान्य नागरिकही शंका उपस्थित करू लागला आहे. आणि हळूहळू या कायद्याचे सर्व कंगोरे बाहेर पडू लागल्यावर या मागचा सत्ताधार्यांचा उद्देश स्वयंस्पष्ट झाला असून विद्यमान सरकार हे लबाड लांडग्या सारखं वागत असल्याशिवाय दुसरं काहीही म्हणवत नाही . केंद्रातील भाजप सरकार पूर्ण बहुमतात आहे . जवळपास तीस मंत्र्यांचे जंबो कॅबिनेट आहे. वरुण त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रिमोट असल्याचा आभास आहे .परंतु हे सर्व फोल असल्यासारख जाणवू लागल आहे . सरकार केवळ दोन बणीये चालवीत आहे दोन बनियांच्या इशार्यावर . राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणे हम दो हमारे दो के लीये . आणि बाणीयांचा एकाच उद्देश असतो ,'अपणा काम बनता नं,तो फिर भाड मे जये जनता '. अंबानी ,अडाणी यांनी ज्याप्रकारे गेल्या निवडणुकीत आपल्या तिजोर्या मोदींसाठी रिकाम्या केल्या त्याच्या ऐवजमध्ये ते हजारो पटीत वसूली करण्याच्या स्पर्धेने ते देश कबज्यात घेऊ लागले आहे .मोदींच्या कार्यकालात अडांनीच्या मालमत्तेत सादीसुदी नव्हे 300 पटीने वाढ झाली आहे . देशातील आतापर्यंत सात ते आठ विमान तळ प्राधिकरण , कोचीन विजयवडा सहित सहा बंदरे , यासह कितीतरी सरकारी सार्वजनिक उपक्रम आडंनींनी घशात घातले . अंबांनीच्या जिओ साठी एमटीएमएल व बीएसएनएल च्या गळ्याचा घोट घेण्याच्या स्थितीत सदध्या सरकार आहे . निवेश आणि लोक परिसम्मती विभागाच्या माध्यमातून मोदी सरकारने आत्तापर्यंत जवळजवळ 109 सरकारी कंपन्या खाजगी उद्धयोगपतींच्या घशात घातल्या आहेत . तरीही हे सरकार धर्माची नशा पाजून आणि देशभक्तीच्या फसव्या ज्वरावर देशवासीयांना उल्लू बनविण्याचे काम सातत्याने करीत आहे . वर्तमान तीन कायद्यामुळे देशातील तमाम शेतकरी उध्वस्त होऊन मोजक्या उद्योगपतींचे बटिक झाल्याशिवाय राहणार नाही आणि अमर्याद साठवणुकीने कृत्रिम टंचाई निर्माण करून सर्वसामान्य जनतेचे भविष्यात कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही , हे स्पस्त दिसत असतांनाही ज्याप्रकारे मोदी यासर्व गोष्टी लपवून ठेवून यातून शेतकर्यांचे भले होणार आहे , शेतकर्यांना पाहिजे तिथे आपला माल विकता येणार आहे ,एमएसपी कायम जाहणार आहे ,आणि हे कायदे पर्यायी (optional) असल्याच्या भ्रामक गोष्टीच जास्त पसरवत आहे . संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी सदस्यांना बजेट वर बोलण्याचा अट्टहास करणारे सरकारी प्यादे आणि सभापति सुद्धा सरकारला मात्र शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे भाषण न रोकटोक करता बिनधास्त करू देत आहेत . राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला धन्यवाद प्रस्तावाच्या माध्यमातून उत्तर देताना मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजळा देत जो डोळ्यांच्या कडा पाण्यावण्याचा अभिनय केला , तो खरोखर आवश्यक होता का ?या अश्रुंनी भक्ताची थोडी भुलवण होईल परंतु देशभर हसे झाले त्याचे काय ? शेतकर्यांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी सरकारने चालविलेल्या प्रयत्नांची वेळीच दखल घेऊन जर हे प्रयत्न यशस्वी झालेत तर त्यांचे जे हाल होणार होते हे लक्ष्यात येताच मायेच्या हृदयातून फुटणार्या हंबरड्यासम शेतकरी नेते राकेश टीकेत ओक्साबोक्षी रडले , या घटनेला पंधरवडा उलटून गेला होता . कदाचित मोदींचा अश्रुंना अश्रुंनी उत्तर देण्याचा डाव असू शकतो . मात्र टीकेत यांचे अश्रु जे काम करून गेले त्या समोर मोदींचे अश्रु बेमानी वाटले ,फसवे वाटले .








No comments:
Post a Comment